शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

साखर कारखाने विकून सहकार कसा टिकेल?

By admin | Published: November 14, 2016 4:53 AM

तीनशे ते चारशे कोटींचे कारखाने अवघ्या चाळीस कोटी रुपयांना विकले गेले, तर सहकार कसा टिकणार?, असा सवाल करत महाराष्ट्राची प्रगती वसंतदादांच्या विचारानेच होऊ शकते

सांगली : तीनशे ते चारशे कोटींचे कारखाने अवघ्या चाळीस कोटी रुपयांना विकले गेले, तर सहकार कसा टिकणार?, असा सवाल करत महाराष्ट्राची प्रगती वसंतदादांच्या विचारानेच होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येथे पाटील यांच्या हस्ते झाला. वसंतदादा स्मारकस्थळी सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार जपले तरच राज्याची प्रगती होऊ शकते. सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात विकून काळ््या पैशांचीच निर्मिती होईल. हे थांबविले पाहिजे. त्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवावा. अन्यथा जन्मशताब्दी कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडण्यात काहीच अर्थ नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, वसंतदादांनी उभारलेली सहकार चळवळ टिकली, तरच ती दादांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. शेतीवरही प्राप्तीकर लागण्याची चिन्हे सरकारच्या धोरणांमुळे दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, वसंतदादा हे कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे शासनानेच जन्मशताब्दी महोत्सव साजरा करावयास हवा होता, मात्र सरकार कोत्या मनाचे आहे. वसंतदादांचे सरकार आम्ही पाडून दुसऱ्या विचारसरणीचे सरकार आणले. तरीही १९८३ ला दादा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मंत्रीपद दिले होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासमोर त्यांनी विनाअनुदानित शिक्षण संस्थांचा मुद्दा परखडपणे मांडला, असे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, असा नारा दादांनी दिला. आताच्या सरकारला लोकहिताच्या गोष्टींत रस नाही. ‘पैसा अडवा, विरोधकांची जिरवा’, या भूमिकेतून ते काम करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. (प्रतिनिधी)