शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

युती झाल्यास मनसेला किती जागा

By admin | Published: February 01, 2017 1:57 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यदाकदाचित सेना-मनसे यांच्यात युती झाल्यास मनसेच्या पारड्यात किती जागा पडतील, याबाबत गणिते मांडली जाऊ लागली आहेत. मात्र, मनसेने विनाअट युती करण्याचा पवित्रा घेतल्याने सेनेकडून नाशिकमध्ये ४० ते ४५ जागांवर बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय स्तरावर उलथापालथ होण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेचा जीव मुंबईत तर मनसेचा जीव नाशिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे, सेना-मनसेत युती झाल्यास प्रामुख्याने, मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी जागावाटपाबाबत पेच उद्भवणार आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-रिपाइं मिळून २२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच जागांवर सेना-मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागून आतापर्यंत पक्षाच्या २८ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील १७ नगरसेवकांनी तर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली असून, मनसेनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडे ८०० हून अधिक तर मनसेकडे ४७३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. आता यदाकदाचित युतीची टाळी वाजलीच तर सेना-मनसे यांच्यात जागावाटप कशाप्रकारे होईल, या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसेने विनाअट युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेकडून सुमारे ८० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या पारड्यात ४० ते ४५ जागा टाकून बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांना आहे. मनसैनिकांमध्ये युती व्हावी याबाबत तीव्र इच्छा असली तरी शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत.