शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

शिवस्मारकासाठी निधी कसा उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 6:23 AM

राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार?

मुंबई : राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार? हे तपशीलवार स्पष्ट करण्याचे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.स्मारकाला विरोध करणारी याचिका चार्टर्ड अकाउंटंट मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. याऐवजी राज्य सरकारने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे भिडे यांनी या याचिकेत म्हटले आहे. याचिकेतील प्रत्येक मुद्द्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी. तीन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. अशा प्रकारचे स्मारक बांधण्यात लोकांचा रस नाही. सरकारने चांगल्या सुविधा पुरवाव्यात व सामान्यांचे राहणीमान सुधारावे, हीच सामान्यांची अपेक्षा आहे. सरकारला स्मारक बांधावेसे वाटत असेल तर त्यांनी आधी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचे जतन करावे, असे याचिकेत म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही राज्य सरकारने स्वत:चा निधी खर्च करून स्मारके बांधली नाहीत. जी काही मोठी स्मारके आहेत, ती देणग्यांमधून उभारली आहेत, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)>आधी समस्यांचे निवारण कराया स्मारकाच्या केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्य सरकारवर कर्जाचा बोजा असताना हा सर्व घाट घालण्यात आला आहे.राज्यात आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारने आधी या समस्यांचे निवारण करावे, असे भिडे यांचे वकील केतन पारेख यांनी न्यायालयाला सांगितले.