शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

मी बाई भाजीवाली, फॉरेनची...

By admin | Published: March 08, 2016 2:57 AM

‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.

ओंकार करंबेळकर,  मुंबई‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. हेच गणित जमवले सायली चुरीने आणि ‘निसर्ग अ‍ॅग्रो’ ही कंपनी स्थापन केली. ती परदेशी (एक्झॉटिक) भाज्या आणि फळांचे उत्पादन आणि विक्री करते.सुरुवातीच्या काळात भारतातील हॉटेल्स किंवा मुंबई-गोव्याला येणाऱ्या क्रुझवर परदेशी भाज्यांना मागणी असे. त्यांना युरोपीय दर्जाची भाजी व फळे पुरवणे हे अवघड काम होते. हे आव्हान सायलीने आई-वडीलांच्या मदतीने स्वीकारले आणि पंचतारांकित हॉटेल्समधून त्यांच्या भाज्यांना मागणी वाढू लागली. ही हॉटेल्स रंग, वास, चवी आणि गुणधर्मांच्या नियमांचे पालन केले तरच माल स्वीकारतात. आपले उत्पादन त्या तोडीचे व्हावे यासाठी सायली प्रयत्न करत असते.आजकाल भारतीयांचे परदेशात जाणे वाढले आहे. परदेशातील भाज्यांची, फळांची गुणवत्ता पाहिल्यानंतर त्यांना भारतातही तशाच गुणवत्तेची आणि सेंद्रिय उत्पादने हवी असतात. ही गरज ओळखून सायलीने व्यवसाय वाढीसाठी नवे प्रकल्प हाती घेतले. तर तिचे आई-वडील- मकरंद व अंजली यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. रंगीबेरंगी सिमला मिरच्या, अस्पॅरॅगस, ड्रॅगन फ्रूट, ब्रोकोली, विविध प्रकारच्या पालेभाज्या, परदेशी टोमॅटो, वांगी अशा भाज्यांना परदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. युरोपात माल पाठविण्यासाठी कडक अटी व प्रमाणांचे पालन करावे लागते. त्यात तिला यश मिळाले. गंमत म्हणजे भारतात तयार झालेल्या थायी भाज्यांची गुणवत्ता, त्यांचा रंग, वास थायलंडमधील मूळ भाज्यांपेक्षा चांगला असल्याचे मत इंग्लंडमधील लोकांनी नोंदविले. आता भाज्या आणि फळांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) करून त्या अधिक काळ टिकाव्यात यासाठी सायली प्रयत्न करत आहे. मालदिवच्या रुक्ष वालुकामयमृदेत पिके घेण्यासाठी सायलीआणि तिच्या आई-बाबांनी मदत केली आहे. काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध तिने घेतला. त्यांना शेतावर नेऊन प्रशिक्षण दिले. बंगळुरू, कोलकाता, उटी, पणजी, नैनितालची बाजारपेठ या नव्या शेतकऱ्यांना मिळाली. शेतीमध्येही स्टार्ट-अप्स आहेत हे सायलीने सिद्ध केले आहे. पुन्हा शेताकडे चलातरुणांनी शहरात येण्यापेक्षा गावातच शेतीचा विकास करता येतो का ते पाहणे गरजेचे आहे असे सायली सांगते. शेती हा सन्मानाचा व्यवसाय आहे. योग्य उत्पादने आणि पद्धत वापरल्यास शेतीत यश मिळवता येते, यावर तिचा ठाम विश्वास आहे.