शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

...तेव्हा ३२ आमदार, ७ खासदार माझ्यासोबत होते; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 21:16 IST

Loksabha Election 2024: ज्यावेळी मी विरोधात बोलत होतो, तेव्हा माझ्यासोबत खिशातले राजीनामे घेऊन बाहेर का पडला नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी केला. 

मुंबई - Raj Thackeray on Shivsena ( Marathi News ) गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत समावेश होईल अशी चर्चा होती. परंतु मनसेनं बिनशर्त महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यात राज ठाकरे शिवसेनेची सूत्रे हाती घेतील या बातमीवरही राज ठाकरेंनी खुलासा केला. जर मला शिवसेना हाती घ्यायची होती तर जेव्हा बाहेर पडलो तेव्हाच घेतली असती असं सांगत राज यांनी जुनी आठवण सांगितली. 

राज ठाकरे म्हणाले की, दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेलो, तिथे केवळ मी आणि तेच होते, मग माध्यमांना कुठून कळाले, काहीही बातम्या ठोकून दिल्या जातात. 'मला असं वाटते' म्हणून माध्यमात सुरू होतं. जर निवडणुकीबाबतीत काही ठरलं तर मी तुम्हाला येऊन सांगेन. मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशी बातमी आली, मला व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो नसतो का? ३२ आमदार, ६-७ खासदार यांची घरी बैठक झाली होती. मी काँग्रेसमध्ये जाणार असं त्यांना वाटत होते. पण मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. मी स्वत:चा राजकीय पक्ष काढेन, पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे मी शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काहीही होणार नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितले. 

तसेच वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. १९९५ नंतर मी जागावाटपात कधीही चर्चेत बसलो नाही. मला ते जमत नाही, माझ्याकडून ते होणार नाही. रेल्वे इंजिन हे महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टानं कमावलेले चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलं नाही. चिन्हावर तडजोड होणार नाही. दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच अशी बातमी आली. पत्रकारांना काही माहिती नसते, येईल त्या गोष्टी सांगायच्या. १९८० मध्ये बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटीला गेले तर गैर काय? त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला? असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, मी महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर टोकाचं प्रेम करतो, मला ज्या गोष्टी दिसल्या नाहीत त्यालाही टोकाचा विरोध करतो. हे तुम्ही २०१९ ला तुम्ही पाहिले. कलम ३७० रद्द झालं तेव्हा अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझे होते. ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे अभिनंदन केले. जी योग्य ती योग्य, जे अयोग्य ते अयोग्य....माझी व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ज्याप्रकारे टीका करतायेत तशी व्यक्तिगत टीका केली नाही. मला मुख्यमंत्रिपद हवं म्हणून विरोध केला नाही. मी भूमिकांवर विरोध केला. ज्यावेळी मी विरोध केला तेव्हा खिशातले राजीनामे बाहेर का पडले नाहीत, सत्तेचा मलिदा हवा होता. तेव्हा का माझ्यासोबत आला नाही? असा सवाल राज यांनी थेट उद्धव ठाकरेंना विचारला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना