शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

Ajit Pawar : "राज्यातलं बदललेलं राजकीय वातावरण मला पसंत नाही," अजित पवारांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 9:35 AM

सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar : सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी रायगडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं. "सध्या जे काही सुरू आहे ते मला अजिबात पसंत नाही. ही आपली महाराष्ट्राची पद्धत नाही," असं ते म्हणाले.

"महाराष्ट्राची निर्मिती होऊन साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळात कशी पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही आठ वर्ष काम केलं. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाचे नेते आणि विलासराव देशमुख सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांच्या भाषणात एकमेकांना चिमटे काढले जात होते, परंतु खालच्या पातळीवर राजकारण कधीही झालं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचीही एकमेकांवर टीकाटिपण्णी व्हायची. परंतु त्यांचे मित्रत्वाचे संबंध अखेरपर्यंत राहिल्याचं आपण पाहिलं. तसं मात्र आताच्या काळात होताना दिसत नाही. हे दुर्देव आहे. जे चुकीचं बोलतायत अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यात सुधारणा केली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले."वादंगाची बातमी मध्यतरी एका वृत्तपत्रात आली होती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. एका पक्षातही वाद असू शकतात. तीन पक्ष आणि अन्य छोटे पक्ष एकत्र येतात. अशात भांड्याला भांड लागल्यावर थोडा आवाज येतोच. परंतु कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो हे अनेकदा महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे. आम्हीही महाविकास आघाडीतील प्रमुख लोक ते दाखवून देऊ," असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण