शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
4
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
5
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
6
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
7
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
8
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
9
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
10
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
11
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
12
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
13
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
14
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
15
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
16
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
17
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
18
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
19
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
20
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 1:00 PM

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांची चौकशी होऊ द्या. हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. आमच्या आई-बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का?, मी नुसतं आई म्हटलं तर ते कसे लागले?, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांनो आई बहिणीचे रक्षण करा. जातीसाठी उभे रहा. मी मरायला घाबरत नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेनी सांगितले.

फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे उभे रहा. समाजासाठी मरण येणं यासाठी खूप भाग्य लागते. मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे. जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही. शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही. मी त्यांची मदत घेतली नाही. मी निष्ठा विकू शकत नाही. तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू?, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभीजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

कोणाचीच आम्हाला मदत नाही-

शरद पवार, प्रवीण दरेकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश आंबेडकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, हरिभाऊ राठोड, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यापौकी कोणाचीच आम्हाला मदत नाही. यांचा पाठिंबा आम्हाला आहे. पाठिंबा द्यावाच लागेल, कारण आम्ही जनता आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले.  

जरांगे पाटलांनी बोललेली भाषा कुणाची?- CM शिंदे

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणारे होते त्यांनी पुढे आणले. कुठल्याही गोष्टी लपत नाही. दगडफेक झाली त्याचाही अहवाल समोर आला आहे. आतापर्यंत सरकार सहानुभूती ठेवली होती. जाळपोळ करायला लागले, आमदारांची घरे जाळली. मालमत्तेचे नुकसान केले. अशा परिस्थितीत सरकारने हातावर हात ठेऊन गप्प बसायचं का?  प्रामाणिकपणे आंदोलन होते, तोपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सगळे गेले. पण कायद्याच्या बाहेरची मागणी करणे हे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीसांबाबत जे जरांगे पाटील बोलले ती भाषा कुणाची आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

देवेंद्र फडणीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरु झाले- CM शिंदे

देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरू झाले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला. शहरी ग्रामीण भागात निर्वाह भत्ता वाढवला. मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती दिली. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होता. तेव्हा मी एकदा नव्हे दोनदा उपोषणस्थळी गेलो. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना तिकडे गेलो. पण जरांगे पाटील यांच्याशी देणंघेणं नाही. परंतु सरकारवर टीका करणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही काढली. सरकार म्हणून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला. फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केलेत. ही भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय पक्षाची भाषा आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार