शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

गुवाहाटीहून मला परत यायचं होतं, पण...; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 6:22 PM

१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

मुंबई - आम्ही गुवाहाटीत गेल्यानंतर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आम्ही काहीतरी वाईट करून आलो असं वाटायला लागलं. मी गुवाहाटीला जाऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटत होते. मला परत यायचं होतं पण आलेला माणूस जाऊन द्यायचा नाही अशी ती वेळ होती. त्याला पर्याय नव्हता असं सांगत बच्चू कडू यांनी सत्तांतराच्या घडामोडीवर भाष्य केले आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे हा मैदानावरचा कार्यकर्ता, रात्री २ वाजता वर्षा बंगल्यावर दीड हजार लोकं असतात. ही चांगली बाब आहे. मी दिव्यांगांसाठी काम केले. उद्धव ठाकरेंच्या शेजारचे लोक, अधिकारी होते ते काम करत नव्हते. दिव्यांगाबाबत दीड वर्ष बैठकही लावली नव्हती. उद्धव ठाकरेंबद्दल आस्था आहे. परंतु ते मातोश्रीवर जेवढे मजबूत होते तेवढे वर्षावर नव्हते. सत्तेत गेल्यावर काही महत्त्वाचे विषय मार्गी लागणं गरजेचे असते पण ते झाले नाही. ही बाब मनाला खटकत होती. त्याचसोबत मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मतदारसंघातील प्रकल्प अर्धवट पडले आहेत. सत्ता किती महत्त्वाची सगळ्यांना माहिती आहे. किती वर्ष सत्तेच्या बाहेर राहणार ही कार्यकर्त्यांची भूमिका होती, सत्ता मंत्री म्हणून पाहिली पाहिजे अशी भावना होती. मतदारसंघातील विकासकामांना चालना देता आली असं त्यांनी सांगितले. 

तसेच रवी राणाने जे शब्द वापरले, तोडपाणी करतो, गुवाहाटीला पैशासाठी गेला. आयुष्यात पैशासाठी काम केले नाही. माझी संपत्ती व्हावी अशी माझी भूमिका नव्हती. विरोधकांचे आरोप होते. पण सत्तेतला माणूस जेव्हा असे आरोप करतो त्यावर शिक्कामोर्तब होतो. माझे नाव घेऊन आरोप केले ते मला खटकले. वेदना देणाऱ्या गोष्टी होत्या. राणांमागे कोण आहे ते शोधणं गरजेचे आहे. पुराव्याशिवाय बोलू नये. आम्ही २०-२५ वर्ष काम करतोय. जात-पात-धर्म राजकारणात आणलं नाही. तत्व, रणनीती राजकारणात जपली असं सांगत बच्चू कडू यांनी राणांवर प्रहार केला. 

...असं वाटलं नव्हतं. काही झाले असते तर प्रहार पक्षात शिंदे गट आला असता. सहजपणे मी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा होईल असं बोलून गेलो. पण असं काही मनात नव्हतं. मी मंत्रिपदातून इतका काळ बाहेर राहीन वाटलं नव्हतं. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल वाटलं होते. पण सगळ्या गोष्टींचे राजकारणात पालन होत नाही. काही डावपेच असतात. मी वयाच्या आठवी-नववीपासून आंदोलन करतोय. २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. कार्यकर्ते थकले आता. शेतकरी पक्षांत विभागला आहे. या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी पद महत्त्वाचं असते. लोकाभिमुख कारभार करता येईल यासाठी पद हवं असते असं सांगत मंत्रिपदाची अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. 

खोकेवाला आमदार हा आरोप वेदनादायी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. खोकेवाले आमदार असा आरोप केला जातो. मला अपंगाचा कैवारी म्हणायचे त्यात खोके शब्द आला ते वेदना देणारं आहे. राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आला आणि भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा आम्ही म्हणायचं का खोके घेतले. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. छत्रपती शिवरायांपासून काही तडजोडीचं राजकारण होत होतं. देवेंद्र फडणवीस अभ्यासू व्यक्ती, एकनाथ शिंदे ग्राऊंड पातळीवर जाऊन काम करतायेत. त्यामुळे ही जोडी एकत्र टिकली तर अनेक कामं मार्गी लागतील. गुवाहाटी ही दुय्यम गोष्ट आहे. ती राजकारणातील रणनीती होती हे लोकांच्या मनातून बाहेर पडलं पाहिजे असं कडू यांनी म्हटलं. ABP माझा कट्टावर ते बोलत होते. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे. राणावर कारवाई व्हावी एवढा तो मोठा नाही. आम्ही तळागाळातून इथपर्यंत पोहचलोय. आम्ही राजकारणात सहज आलो नाही. पैसे कुणाकडून घेतले त्याचे उत्तर आहे का? सत्ता अशीच स्थापन होत असेल तर लोकशाहीचं पतन झालं हा आरोप खराच आहे. माझ्यावर आरोप केले त्यामुळे मी एकटा नाही तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही अडचणीत आलेत असं कडू यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस