शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:21 IST

मविआने फुंकले प्रचाराचे रणशिंग

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मविआने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबविण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, असे जाहीर केले.  

ठाकरे म्हणाले, आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. 

महायुती सरकार घाबरणारे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर १५०० रुपयांत बहिणींचे प्रेम विकत घेऊ शकत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नसल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेत भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. 

जागा वाटपावरून भांडण नको जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा भाजपचा प्रयत्न: पटोले  दिल्लीत बसलेले भाजपचे नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभेत त्यांचे हे एटीएम बंद करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

संविधानावरील संकट अजूनही कायम: पवार

संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथले सरकार बदलण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केले.

पवार म्हणाले, महाराष्ट्राची उद्याची दिशा काय राहणार? महाराष्ट्रावर जे संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे पोहोचविण्यासाठी ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. मात्र, देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. कारण त्यांच्या विचारधारेला संविधानाची अडचण झाली आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले