शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 6:19 AM

दहावीत उपाध्ये, सरदेसाई, शहा, भासैन ठरले टॉपर्स...

मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) या परीक्षांचे निकाल रविवारी जाहीर झाले. दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई आणि ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकालांमध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दहावी बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावी बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी) परीक्षेत बॉम्बे स्कॉटिश स्कूलची श्रेया उपाध्ये, चॅम्पियन स्कूल, मुंबईचा अद्वय सरदेसाई, कपोल इंटरनॅशनल स्कूलचा तनय शहा आणि ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा यश भासैन या चौघांनी ९९.८० टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची इप्सिता भट्टाचार्य ही बारावी परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत. दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षादेशभरातून दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी आयसीएसई (दहावी) परीक्षा दिली. त्यात ९८.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयएसई (बारावी) परीक्षेसाठी ९८ हजार ५०५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

दहावी, बारावीत मुलींचीच सरशीआयसीएसई (दहावी) बोर्डात ९९.२१ टक्के मुली, तर ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. आयएसई (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत ९८.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे. बारावी बोर्ड परीक्षेत देशातून पाच विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत, तर दहावी बोर्ड परीक्षेत नऊ विद्यार्थी पहिल्या रँकवर आहेत.

पुनर्तपासणी २१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा रविवारी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि २१ मेपर्यंत उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मखिजा महाराष्ट्रात प्रथमश्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेची कीर्ती मखिजा ९९.२५ टक्के मिळवून महाराष्ट्रात प्रथम, तर अनन्या शिदोरे आणि मयांक अगरवाल हे दोघेही ९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSSC Resultदहावीचा निकाल