शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

"बाळासाहेब हयात असते तर त्यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’ रामदास कदमांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 4:09 PM

Ramdas Kadam: बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत.

मुंबई - बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. आताही आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांचा गद्दार म्हणून उल्लेख करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करू दिली असती का? असा सवाल रामदास कदम यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले की, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

दरम्यान, आदित्य ठाकरे माझे मित्र होऊ शकत नाही, कारण त्यांचं वय ३२ आहे तर माझा राजकारणातील अनुभव ५२ वर्षांचा आहे. मातोश्री आमचं दैवत आहे, मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं नाही असं मी ठरवलंय. पण अगदी नाईलाज होतो, तेव्हा काही खुलासे करावे लागतात. उद्धव ठाकरेंना माझ्याकडून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा, असे रामदास कदम पुढे म्हणाले.

शिवसेना आणि शिंदे गट यांनी एकत्र यावं अशी इच्छा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने उदय सामंत यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत विचारले असता रामदास कदम म्हणाले की, उदय सामंत असं म्हणत असतील तर आनंद आहे. गुवाहाटीत असताना मीसुद्धा तसा प्रयत्न केला होता. त्यावेळी माझं ऐकलं गेलं नाही. शरद पवार आले. त्यांनी कानामध्ये काही सांगितलं. कायदेशीर लढाई लढायला सांगितले. आता न्यायालयीन लढाई सुरु असताना बाकीच्या गोष्टी कशा होऊ शकतात. रामदास कदम अचानक अॅक्टिव्ह कसे झाले. त्यांना मंत्रिपद द्यावं लागेल, विधान परिषद द्यावी लागेल. शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. या सगळ्या बातम्या मातोश्रीवरून पसरवल्या जातात, या बातम्या पसरवणाऱ्यांमागे मिलिंद नार्वेकर आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेRamdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना