शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By admin | Published: April 04, 2016 2:18 PM

मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ४ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घालत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. 
 
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधक जाणूनबुजून गोंधळ घालत आहेत, मतांचं राजकारण करत आहेत असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री पद असो किंवा नसो 'भारत माता की जय' बोलावेच लागेल. 'भारत माता की जय' कालदेखील म्हंटलं होतं आजही म्हणू असंदेखील मुख्यमंत्री बोलले आहेत. 
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएस कार्यकर्ता म्हणून बोललात की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असा खोचक सवालही यावेळी विचारला. मी जाती धर्मावर बोललेलो नाही, देशाबद्द्ल बोललेलो आहे. ज्या लोकांचं देशावर प्रेम नाही, जे लोक मुद्दामुन वाद वाढवत आहेत त्यांना उद्देशून बोललो असल्यांच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं' केलेल्या वक्तव्यावरुनदेखील वाद निर्माण झाला होता. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला होता.