शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:01 IST

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली – छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आमचं प्रेम आहे. आम्ही त्यांच्याशी कायम संपर्कात असतो. परंतु निवडणूक ही वेगळी असते. निवडणुकीत कोण कोणत्या भूमिका घेऊन उभं राहतो त्याकडे पाहिले जाते. संसदेत त्यांना बोलू दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी राहिलो त्यामुळे छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनाराज्यसभा निवडणुकीत २ जागा लढवणार आहे. लोकशाहीने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला आहे. तसेच निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यावर प्रेम आहे. पण निवडणुकीत कोणत्या भूमिका घेऊन उभे राहतात याकडे पाहिले जाते. छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता. मराठा आरक्षणावर त्यांना संसदेत बोलून दिले नाही तेव्हा मी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभा राहिलो होतो असंही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या कोर्टात चेंडू ढकलला

राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे १ जागा असताना शिवसेनेने मोठे मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती. तेव्हा शरद पवारांनी(Sharad Pawar) पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला २ जागा देण्याचं कबूल केले होते. अलीकडेच शरद पवार, उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांची बैठक झाली आहे. त्यात याबाबत चर्चा झाली असावी. कुणी किती जागा लढवायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. १० सूचक जे आणतील ते जागा लढवू शकतात. संभाजीराजेंना(Chhatrapati Sambhajiraje)  पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांशी कुठलेही चर्चा झाली नाही. सर्वोच्च नेते बोलतील असंही त्यांनी सांगितले.

तर शरद पवारांनी मात्र राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अतिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRajya Sabhaराज्यसभा