शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग नेमणार, अग्निवीर योजनेची समीक्षा करणार', काँग्रेसचं मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 18:22 IST

Congress Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असे जयराम रमेश यांनी सांगितले

धुळे -  भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली व्यक्ती राहुल गांधी आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारावेळी त्यांनी पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्यानंतर तेलंगणातही अशाच गॅरंटी जाहीर केली होत्या आता या गॅरंटींची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यावेळी या गॅरंटी शब्दावर भाजपाने टीका केली होती परंतु आज दररोज मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी यावरच त्यांना भर द्यावा लागत आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असेही जयराम रमेश यांनी सांगितले. 

धुळे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, महिला न्याय गॅरंटी ची घोषणा ही ऐतिहासिक व क्रांतीकारी आहे. मोदींनी १० वर्षात दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही. देशातील काही मुठभर लोकांना मोदी सरकारने १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले नाही. युपीए सरकारने मात्र शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे काँग्रेस सत्तेवर आल्यास या योजनेचीही समिक्षा केली जाईल.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सावित्रिबाई फुलेंच्या जन्मभूमी व कर्मभूमीत महिला सक्षमिकरणाची महिला न्याय गॅरंटी दिली ही खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव आहे, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला ताकद देणारा आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांचा भागिदारी वाढलेली दिसत आहे. महिला सक्षमिकरणात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. भाजपा सारखा चुनावी जुमला अथवा मोदी गॅरंटी सारखी खोटी नाही, काँग्रेसची गॅरंटी ही पक्की व वॉरंटी सुद्धा आहे. महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल प्रदेश  कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.  

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राDhuleधुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४