शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला

By मनोज मुळ्ये | Updated: May 5, 2024 08:55 IST

Ratnagiri-Sindhudurg Lok sabha Election: वातावरण निर्मिती करण्यात महायुती, महाआघाडीला यश. कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

- मनोज मुळ्येलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : गेली अनेक वर्षे सुरू असलेला राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पुन्हा दिसत आहे. त्यामुळे गतवेळेपेक्षा यावेळेच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची अजूनपर्यंत एक-एकच मोठी सभा झाली आहे. मात्र, महायुतीकडून आणखी दोन मोठ्या सभा बाकी असून, त्यावर महायुतीची मोठी भिस्त आहे. सद्य:स्थितीत दोन्ही पक्षांना विजयाची समान संधी आहे.

कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

लोकसभेच्या मतपत्रिकेवर मशाल हे चिन्ह प्रथमच, तर कमळ हे चिन्ह ३३ वर्षांनी आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी मोठ्या सभांची संख्या मोजकीच असून, छोट्या सभा, खळा बैठका यांनाच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्याचाही हेतू आहे.

कागदावरच्या संख्येत तरी महायुती प्रभावीगतवेळीची मते आणि त्यानंतर झालेली फाटाफूट पाहता महायुती प्रभावी दिसते. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत, तर दोनच मतदार संघ महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे महायुतीकडे ताकद अधिक आहे, असे दिसते.विनायक राऊत यांच्या मतांमधून भाजपची आणि शिंदेसेनेची मते वजा झाली आहेत. त्याबदल्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची मते त्यांना मिळणार आहेत. मात्र, वाढलेल्या मतांपेक्षा कमी झालेल्या मतांची संख्या अधिक आहे. कागदावर हे चित्र असले तरी सामान्य मतदार उद्धवसेनेच्या पाठीशी आहे की शिंदेसेनेच्या, हे स्पष्ट झालेले नाही.

सामंत बंधुंमधील वाद आघाडीच्या फायद्याचाnकिरण सामंत यांनी मंत्री उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर हटवल्याने या दोन भावांमध्ये वाद असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचा शिंदेसेनेकडून होणा�या प्रचारावर परिणाम होणार आहे. सामंतांमधील वादानंतर आता राऊत यांनी किरण सामंत यांचे कौतुक सुरू केले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देभाजपने आपला पक्ष फोडला, हाच आक्षेप लोकांसमोर ठेवत उद्धवसेनेने भाजप आणि शिंदेसेनेवर टीकास्त्र रोखले आहे.दहा वर्षांत कोकणात उद्योग उभारण्यापेक्षा येथून हाकलण्यात आलेल्या उद्योगांची संख्या अधिक आहे, असा भाजपचा आक्षेप आहे.सिडको प्राधिकरण हा उद्धवसेनेने कळीचा मुद्दा केला आहे, तर रत्नागिरीच्या विकासाचा विषय महायुतीने उचलून धरला आहे.

२०१९ मध्ये काय घडले?विनायक राऊत    शिवसेना (विजयी)    ४,५८,०२२नीलेश राणे    स्वाभिमान पक्ष    २,७९,७००नवीनचंद्र बांदिवडेकर    काँग्रेस    ६३,२१९नोटा    -    १३,७१३

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    विनायक राऊत     शिवसेना         ४,९३,०८८    ५५%२००९    नीलेश राणे    काँग्रेस    ३,५३,९१५    ४९%२००४    अनंत गीते    शिवसेना    ३,३४,६९०    ५९%१९९९    अनंत गीते    शिवसेना        २,९३,८३४    ५२%१९९८    अनंत गीते    शिवसेना        २,३८,९२८       ४६%

एकूण मतदार    १४,५१,६३०

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग