शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 5:43 AM

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा (जि. पालघर) : आदिवासी हे येथील मूळ रहिवासी असून, त्यांच्या जागा उद्योजकांनी ताब्यात घेतल्या आहेत. आमचे सरकार आल्यास सहा महिन्यांतच आदिवासींच्या जागा त्यांना परत करू, अशी गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दिली. याचबरोबर वनखात्याची जमीन तसेच जंगलावर आदिवासींचाच अधिकार असेल, ही आम्ही गॅरंटी देतो, असेही ते म्हणाले. 

पालघर जिल्ह्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सुरुवात शुक्रवारी सकाळी मोखाडा येथून करण्यात आली. त्यानंतर जव्हार, विक्रमगड व नंतर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे राहुल गांधी यांनी जनतेशी संवाद साधला. भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरिबीचे प्रमाण असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक वर्षाला गरीब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये देऊन गरिबी हटवण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

‘अग्निवीर’वर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने जवानांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले आहे, तर चीनच्या जवानांना पाच वर्षे प्रशिक्षण दिले जाते. या दोघांमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणवाला की पाच वर्षांचा प्रशिक्षणवाला टिकेल, असा सवाल त्यांनी नागरिकांना विचारला.  

शेतकरी-आदिवासींची कर्जे माफ केली? 

- केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

- भिवंडी, वाडा, मनोर, कुडूस या नाक्यांवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४