शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही - श्रीहरी अणे

By admin | Published: January 14, 2016 1:06 PM

विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे वक्तव्य करत महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी केल्याने वादात सापडलेले महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भवरून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ' विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे अणे यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले असून आता पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केले होते.  वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत असल्याची टीकाही अणे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून खवळलेल्या शिवसेनेने अधिवेशनात गदारोळ माजवला होता. अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेनेने हक्कभंग प्रस्तावही आणला होता. तो वाद शमतो ना शमतो तोच अणे यांनी विदर्भावरून नवे वक्तव्य करत नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
 
श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी असून गेल्याच महिन्यात शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणा-या शिवसेना नेत्यांनी अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहीजे असे सेना आमदारांचे म्हणणे आहे. 
विदर्भातलं जनमत घेतलं तर ८० टक्के लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असतील, असे वक्तव्य अणे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं