शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

‘ते’ साडेसहा टीएमसी वाचले नसते तर... पाणीबाणी

By admin | Published: May 09, 2016 12:53 AM

सोलापूरसाठी उजनी धरणात ९.४० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबरला जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिला होता. आमदार भारत भेलके यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला होता.

बापू बैैलकर , पुणेसध्या खडकवासला प्रणालीतून दौंड, इंदापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने शहर-ग्रामीण असा वाद रंगला आहे. मात्र, उजनीत वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी व याचिकाकर्त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे जानेवारीत आपले साडेसहा टीएमसी पाणी वाचले. ते पाणी उजनीत गेले असते तर आज खडकवासलातून दौंड, इंदापूरला पाणी मिळालेच नसते, उलट पुणेकरांनाही मोठी पाणीकपात सहन करावी लागली असती. पाणी पाणी करण्याची वेळ सर्वांवरच आली असती.सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आद्र्रा व वडीवळे या धरणांमधून सोलापूरसाठी उजनी धरणात ९.४० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबरला जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिला होता. आमदार भारत भेलके यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे तीन महिने उजनीत पाणी सोडण्याचा प्रश्न ढवळून निघाला होता. पुणे जिल्ह्यात या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या निर्णयावर स्थगिती मिळवणे गरजेचे होत, अन्यथा पाणी उजनीत गेले असते. याचवेळी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच उजनीत पाणी सोडण्याच्या एका याचिकेवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे उजनीत हे पाणी जाणारच, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हे पाणी गेले तर जिल्ह्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी खंबीर भूमिका घेतली व आपली बाजू ठामपणे मांडली. त्यामुळे सुटीतही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे शक्य झाले. त्यामुळे उच्च न्यायालयात अ‍ॅड. सुरेश पलांडे व धैर्यशील पलांडे यांनी याचिका दाखल केली आणि पाणी सोडण्यास स्थगिती घेतली. त्यानंतर हायकोर्टाने प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, यासाठी हे प्रकरण प्राधिकरणाकडे पाठविले. ६ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी होऊन पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय प्राधिकरणाने दिला. यामुळे जिल्ह्यातील साडेसहा टीएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. यात मुळशी, कासारसाई, आंध्रा व वडिवळे यातील पूर्ण पाणी वाचले, तर भामा आसखेड, चासकमानमधील पाणीही काही प्रमाणात वाचले. चासकमान धरणात फक्त ३९.८५ दलघमी पाणी राहिले असते. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी एकच आवर्तन मिळाले असते. पुढील सहा महिने शेतकऱ्यांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले असते.चासकमान व भामा आसखेड धरणाखालील ४० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र त्या पाण्यावर अवलंबून होते. त्या क्षेत्रावरील पिके करपली असती.टंचाईकाळात आता चासकमान, भामा आसखेड, व खडकवासलातून जे पिण्याचे आवर्तन सोडले आहे ते सोडता आले नसते आणि पाण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला असता. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे आम्हाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करता आली आणि पाणी सोडण्यावर स्थगिती घेता आली. याचा परिणाम म्हणून साडेसहा टीएमसी पुण्याचे पाणी वाचले. यात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली अन्यथा पाण्याची परिस्थिती भीषण झाली असती. - अ‍ॅड. सुरेश पलांडे, याचिकाकर्ते