शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

"...तरच मी सल्ला मानला असता", प्रकाश आंबेडकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; युतीत ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:51 PM

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपूर वापरायला हवेत असा सल्ला दिला. आता राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सांभाळून बोला हे मला ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे शिवशक्ती-भिमशक्ती युतीला चारच दिवस झालेले असताना युतीत ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"देशात कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कोणताही भारतीय एकमेकांचा शत्रु होऊ शकत नाही. दोन राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण शत्रुत्व अजिबात नाही. मनुस्मृतीच्या मुद्द्यावरुन आमचे भाजपासोबत टोकाचे मतभेद आहेत आणि ते राहतील. जर भाजपानं मनुस्मृतीची विचारधारा सोडण्याचा निर्णय घेतला तर आमचेही मतभेद टळतील", असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे", असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला. 

संजय राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. "मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असं सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

...तर भाजपासोबतही एकत्र बसायला तयार"कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु नाहीत. जे जे राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, मतदार आहेत ते भारतीय आहेत आणि भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकचे मतभेद असू शकतात. भाजपा आणि आरएसएस सोबत आमचे टोकाचे मतभेत आहेत. ते अनेकवेळा मांडलेले आहेत. आरएसएस आजही मनुस्मृतीला मानेत आणि आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत राहून राज्य करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र बसायला तयार आहोत. मनुस्मृती कुठलाही धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा तो ग्रंथ आहे. हे जर बदलणार असेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम होणार असेल तर आम्ही एकत्र बसायला तयार आहोत", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊत