शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:57 IST

आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

पुणे - एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्याचे नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांचे ऐकावं असं ते नेते नाहीत. ते घटनाबाह्य पद्धतीने पदावर बसलेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर बेकायदेशीर बसले आहेत. शिंदे स्वत:ला नेते साध्य करण्यासाठी कधी काय निर्णय करतील हे मला सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या मराठा आंदोलनाला मॅनेज करण्याची क्षमता नाही. हा अंतर्गत राजकारणाचा घोटाळा आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

पुण्यात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली त्यात संजय राऊत म्हणाले की, जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते. सरकार ती भूमिका मांडताना त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो सरकारविरोधात बंड करतोय. अशावेळी मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करू शकतात. पण ज्याअर्थी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतायेत, मुख्यमंत्री वेगळे बोलतायेत. छगन भुजबळ वेगळे मांडतायेत. याचा अर्थ सरकारच्या मंत्रिमंडळात बेबनाव आहे. म्हणून मुख्यमंत्री खरोखरच सक्षम असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना मी बडतर्फ करतोय अशी शिफारस राज्यपालांना केली पाहिजे. हिंमत असेल तर ते नेते असं खुलं चॅलेंज राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे. 

तसेच तू ओबीसींची भूमिका घे, मी मराठ्यांची भूमिका मांडतो. दोघांना मुर्ख बनवतो असं सत्ताधाऱ्यांचे असू शकते. कुरघोडी करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणतोय. परंतु या सरकारमध्ये हिंमत नाही. जनतेच्या मनात काय हे समजायचे असेल तर निवडणूक घ्या. १४ महापालिका निवडणूक रखडल्या आहेत. न्यायव्यवस्था तुमची गुलाम आहे. तुम्ही आता निवडणूक घ्या. आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, ज्यादिवशी देशातील जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल तेव्हा भाजपा हरेल. भाजपा जिंकत नाही तर मशिन जिंकते. अलीकडच्या काळात मध्य प्रदेशात जे निकाल लागले ते लागूच शकत नव्हते. काहीतरी गडबड आहे. EVM नसेल तर भाजपा ग्रामपंचायतही जिंकणार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे हा किडा काढणारे भाजपाचेच होते. काँग्रेस सरकार असताना सगळ्यात आधी किरिट सोमय्या पुढे आले. देशभरात EVM घोटाळ्याबाबत जागरुक करण्याचे काम भाजपाने आधी केले. घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तीच्या गुलाम बनून काम करणार असतील तर न्याय कशा मिळणार? देशातील लोकशाहीचे मालक गुजरातमधील दोन व्यापारी झालेत असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSushma Andhareसुषमा अंधारे