शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

सरकारचे कारभारावर दुर्लक्ष - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 27, 2017 9:28 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थांबली तरी शिवसेनेची भाजपाविरोधातील टीकेची धार अद्याप कमी झालेली नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी थांबली तरी शिवसेनेची भाजपाविरोधातील टीकेची धार अद्याप कमी झालेली नाही. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी  पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहे, त्यामुळे या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले. 
रंगशारदा सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित "गर्जते आई मराठी" कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले,  "कालच देशाची सुरक्षा हातात असणाऱ्या लष्कराच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली,  या सरकारचे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे. यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भाषणे देत फिरत आहेत. यात परिवर्तन व्हायला हवं, मी आज राजकीय भाष्य करणार नाही, पण कारभारात बदल झाला पाहिजे."
यावेळी शिवसेनेच्या भविष्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले, "26 जानेवारीच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे शिवसेनेची 25 वर्षे युतीमध्ये सडली आहेत. पण आता पुढे जायचे आहे. नुसत्या कार्यक्रमांसाठी नव्हे तर मराठी माणसांच्या हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. पुढच्या काळात बाळासाहेबांना, मराठी माणसाला, कुसुमाग्रजांना अभिमान वाटावा अशी शिवसेना घडवायची आहे," असे ते म्हणाले.