शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

बेकायदेशीर फलकांचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

By admin | Published: March 05, 2016 3:35 AM

बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते

मुंबई : बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने आता थेट राज्य सरकारलाच या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनाही सर्व पोलीस ठाण्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.चेंबूर येथील बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, या प्रकरणी न्या. अभय ओक व न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठाने सर्वांना अवमान नोटीस बजावली. महापालिकेचे अधिकारी संरक्षण मागण्यासाठी देवनार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना वाट पाहत ताटकळत ठेवले. त्यांना संरक्षणही दिले नाही, त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणी वरिष्ठांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच संरक्षण मागण्यासाठी आलेल्या पोलिसांना वाट न पाहता संरक्षण देण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत, असे निर्देशही खंडपीठाने पोलीस संचालकांना दिले. (प्रतिनिधी)>सेनेच्या निर्णयाचे स्वागतया प्रकरणी सामान्य माणसांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याऐवजी पक्ष कार्यालयात तक्रार करावी, अशी सूचना गुरुवारी शिवसेनेतर्फे अ‍ॅड. विश्वजीत सावंत यांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती धुडकावून लावली. शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. सावंत यांनी सेनेने अशा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी १८००-२२-८५९५ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने तक्रारदाराचे नाव व त्याची इतर माहिती घेण्यात येणार नाही, याची खात्री करा, असे सेनेला सांगितले. मात्र तक्रारदाराची माहिती गुप्तच ठेवण्यात येईल, असे आश्वासन अ‍ॅड. सावंत यांनी दिले.शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांनीही टोल फ्री नंबर उपलब्ध करावा व त्याची दखल घ्यावी, असे म्हणत खंडपीठाने प्रत्येक राजकीय पक्षाला असा टोल फ्री नंबर उपलब्ध करणार का? अशी विचारणा करत एका महिन्यात याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले.