शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
4
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
5
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
6
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
7
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
8
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
9
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
10
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
11
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
12
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
13
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
14
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
19
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
20
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात

मी उभा आहे रंगमंचावर एकटा...

By admin | Published: February 28, 2017 1:36 AM

नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’....

पुणे : ‘नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’.... ‘मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा’....‘नाटक नव्हे, तीन तासांचे अर्करूप अस्तित्व संपले आहे ते इथे फक्त माझ्याजवळ’... थरथरता तरीही धीरगंभीर आवाज, कातर स्वर, ‘चष्मा नको’ असे म्हणत स्वत:च्या दृष्टीवरचा विश्वास आणि कुसुमाग्रजांच्या शब्दांतून व्यक्त होणारा ‘नटसम्राट’... मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागू कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले आणि त्यांच्या ‘परकाया प्रवेशाचा’ अत्युच्च आविष्कार रसिकांनी ‘वाहवा’ची दाद देत अनुभवला.निमित्त होते ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या वाचनाचे. कुसुमाग्रजांच्या ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ या संग्रहांतील निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे वाचकांसाठी नव्याने प्रकाशन झाले. कुसुमाग्रजांच्या श्रीराम लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरणही या वेळी झाले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी डॉ. श्रीराम लागू, रामदास भटकळ, विजय लागू, रेणुका माडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. भटकळ म्हणाले, ‘मी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या आहेत. प्रत्येक वेळी कवितेचा नवा अर्थ उलगडत जातो. ‘नटसम्राट’ नाटकाला डॉ. श्रीराम लागू यांनी सर्वोच्च दर्जा मिळवून दिला. या नाटकातील भूमिकेत शिरलेले लागू त्यांना स्वत:ला समोर बसून अनुभवता येणार नाहीत, हे दुर्दैव. त्यांचे कवितावाचन पुढील पिढीपर्यंत गेल्यास तरुणाई समृद्ध होईल, याची खात्री वाटते.’(प्रतिनिधी)>कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त देशपांडे म्हणाले, ‘मी लहानपणापासून कुसुमाग्रजांच्या कवितांचा आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाचा चाहता आहे. कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. मला कवींचे गद्य नेहमीच भावते. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेला अभिप्रेत असलेला ध्वनी म्हणजे डॉ. लागू यांचा आवाज आहे. लिखित अक्षरवाङ्मयाला समर्पक ध्वनिस्वरूप लाभले आहे.’