शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्यांचा तातडीने खुलासा करा; राज्य सरकारचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:02 IST

प्रत्येक विभागाने एक समन्वय अधिकारी नेमावा आणि ठरवून दिलेल्या वेळेत माहितीसह खुलासा पाठवावा, असेही निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या विविध योजना, धोरणे किंवा प्रकल्पांबाबत वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्यांचा तातडीने खुलासा करावा, असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना दिले आहेत. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंदर्भातील वस्तुस्थिती प्रशासनाकडून मांडली जावी, यासाठी प्रत्येक विभागाने एक समन्वय अधिकारी नेमावा आणि ठरवून दिलेल्या वेळेत माहितीसह खुलासा पाठवावा, असे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि डिजिटल माध्यमात विविध बातम्या येत असतात. यात राज्य सरकारबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या वस्तुस्थितीला धरून नसलेल्या किंवा प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय तसचे वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने विस्तृत शासन निर्णय जारी केला. सरकारच्या कारभाराबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर प्रतिसाद दिल्यास सरकारची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ फेब्रुवारी रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रशासन विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. 

अशी असेल कार्यपद्धती

  • वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांचे संकलन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे केले जाईल व अशा बातम्यांची कात्रणे व मजकूर त्याच दिवशी संगणक प्रणालीद्वारे संबंधित विभागांकडे पाठविले जातील. तर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील अशा बातम्यांची क्लिप पाठविली जाईल.    
  •  वृत्तपत्रातील बातम्यांबाबत वस्तुस्थितीदर्शक माहितीसह, विभागाचा अभिप्राय सचिवांची मान्यता घेऊन बारा तासांच्या आत माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे पाठवावा. तर, इलेक्ट्राॅनिक माध्यमांतील बातम्यांबाबतचा प्रतिसाद दोन तासांत मंत्री, राज्यमंत्री, सचिव, आयुक्त अथवा संबंधित अधिकाऱ्यांच्या बाईट्सह दोन तासांत पाठविण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. 
  • यासाठी प्रत्येक विभागाने सहसचिव किंवा उपसचिव अधिकाऱ्याची समन्वयासाठी नियुक्ती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार