शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाने दडी मारल्यानी पीक वाढीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:48 IST

नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता

पुणे: राज्यात बहुतांश विभागात पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाआभावी त्यांच्या वाढीवर परिणाम होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १ जून ते २८ सप्टेंबर कालावधीमध्ये राज्यातील सरासरी पाऊस १ हजार ११७.८ मि.मी.असून २८ सप्टेंबरपर्यंत ८६४.९ म्हणजेचे सरासरीच्या ७७.४ टक्के पाऊस झाला आहे.पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती तसेच लातूर विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पुढील पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे,असे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हात २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला आहे.तर नाशिक,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,कोल्हापूर,औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उत्स्मानाबाद,परभणी,बुलढाणा आणि चंद्रपूर या १३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.केवळ ठाणे,रत्यागिरी व सातारा या तीनच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून इतर १७ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ४६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र, चंद्रपूर जिल्ह्यात ११ हजार १६१ हेक्टर क्षेत्र,नांदेडमधील ७१ हजार ३४९ हेक्टर तर जळगावमधील २५४ हेक्टर,गडचिरोलीतील ९ हजार ६४२ हेक्टर ,नंदूरबारमधील ६१५ हेक्टर,धुळे ८५८ हेक्टर ,सातारा ३१८ हेक्टर व सांगली ४०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात कापूस,सोयाबीन, तूर, भात,कांदा,ज्वारी,बाजरी, नाचणी, मुग, उडीद, भुईमुग,मका,वटाणा ,घेवडा,पावटा आदी पिकांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे राज्यात सोलापूर जिल्ह्यात २९ हजार ५३९ हेक्टर ,अहमदनगर जिल्ह्यात ३४ हजार ७९८,पुणे २७ हजार ४२ हेक्टर, कोल्हापूर ९ हजार हेक्टर,सांगली ३ हजार ४०० हेक्टर व सातारा जिल्ह्यात ४ हजार ५०० हेक्टर असे एकूण १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसपिकाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे...............पुणे विभाग पावसाचा खंड  पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम झाला असून त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत एकूण ३९ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के,१६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, ४ तालुक्यात ७५ ते १०० तर ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती