शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

रोजगारनिर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा - राजन

By admin | Published: April 27, 2016 5:00 AM

नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

मुंबई : नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्टार्टअप्ससाठी चांगले व्यावसायिक वातावरण, छोट्या कंपन्यांसाठी उदार कायदे आणि चांगल्या सामाजिक सुरक्षेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला आहे.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्मिती आणि स्वरोजगार ही सर्वात मोठी संधी आहे. यासाठी सरकारही कसोशीने प्रयत्न करीत आहे. ही स्पष्ट बाब आहे; परंतु प्रापर्टी राईट प्रोटेक्शन आणि पारदर्शी कर प्रणालीवरही लक्ष देण्याची गरज आहे.राजन यांनी पुन्हा एकदा छोट्या कंपन्यांसाठी सोपा प्रवेश आणि एक्झिट नॉर्म्स बनविण्यावर भर दिला. ते म्हणाले की, अशा कंपन्या सुरू करण्यासोबत त्या बंद करतानाही प्रचंड नियमांचा सामना करीत आहेत. उदार व्यावसायिक वातावरण केवळ आर्थिक प्रगतीच्या नजरेतून महत्त्वाचे आहे असे नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेसाठीही ही बाब महत्त्वपूर्ण आहे. व्यावसायिक वातावरण अनुकूल होण्याने सामाजिक वातावरणालाही मदत मिळते.राजन म्हणाले की, नियम उदार केल्यामुळे जास्तीत जास्त दलित कंपन्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल यासाठी त्यांनी एका अहवालाचा उल्लेख केला. त्यात ब्रिटन आणि इटली यांच्यातील स्टार्टअप्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ब्रिटनच्या तुलनेत इटलीत जास्त स्टार्टअप्स कार्यक्रम सुरू होतात; पण जसजसा कल पुढे जातो तसतसे ब्रिटनमधील कंपन्यांची संख्या वाढत जाते. कारण ब्रिटनमध्ये छोट्या कंपन्यांसाठी उदार नियम आहेत, तर ते इटलीत कठोर आहेत.