शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:37 AM

बाबासाहेबांना महिलांनी दिले होते मानपत्र

विश्वास पाटीलकोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणीच बिंदू चौकात पुतळा बसविणाऱ्या कोल्हापूरने त्यानंतर दोनच वर्षांनी मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. विशेष म्हणजे महिलांनी हा समारंभ आयोजित केला होता. महिलांना वारसाहक्कात स्थान देणारे हिंदू कोड बिल मंजूर करावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या डॉ. बाबासाहेब यांना पाठबळ देण्याची भूमिका त्यामागे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या आठवणी ताज्या झाल्या.

करवीर भगिनी मंडळ, शुक्रवार पेठ भगिनी मंडळ, महिला सेवा मंडळ, वनिता समाज, नामदेव महिला मंडळ, शारदादेवी महिला मंडळ, स्त्री मंडळ, शिवाजी पेठ भगिनी मंडळ आणि मराठा महिला मंडळ ही मानपत्र देणारी नऊ मंडळे आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच या महिलांना बाबासाहेबांना मानपत्र द्यावे असे वाटावे यामध्येच कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय प्रगल्भतेचे प्रत्यंतर येते. हे मानपत्र २५ डिसेंबर १९५२ रोजी राजाराम टॉकीजमध्ये देण्यात आले. विशेष नोंद म्हणजे बाबासाहेब त्या सोहळ्यास पत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्यासह आले होते. 

या भगिनी मानपत्रात म्हणतात...माननीय बाबासाहेब, कोल्हापुरात १५ वर्षांपासून नऊ भगिनी मंडळे भगिनी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. मुंबई प्रांतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा होण्यापूर्वी तो व्हावा, असा आवाज प्रथम कोल्हापूरच्या महिलांनीच उठवला होता. सन १९४१ व १९४७ मध्ये हंसा मेहता व लेडी रामराव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील अखिल भारतीय महिला परिषदेत वारसा हक्काची मागणी झाली. हिंदू कोड बिलानेच महिलांच्या आकांक्षांची पूर्तता होणार हे जाणून सर्व भगिनींनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे इच्छा नसतानाही राज्यकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत या बिलास पाठिंबा द्यावा लागला. आज जरी प्रासंगिक लाभासाठी हे बिल मागे खेचण्याचा काहीजण प्रयत्न करत असले तरी त्यांचा तो प्रयत्न म्हणजे सुपाने सूर्य झाकण्याचा हव्यास बाळगण्यासारखेच वेडेपणाचे आहे. (संदर्भ : डॉ. जी.पी. माळी यांचे कोल्हापूरची शतमानपत्रे हा ग्रंथ)

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर