शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मी २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत स्वत:ची तुलना केली तर...; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:03 IST

राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांत आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ साली पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या फडणवीस यांना २०१९ मध्ये दुसऱ्या शपथविधीनंतर केवळ काही तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२२ साली सरकार आल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आता भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. या राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांतील अनुभवांतून आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागील १० वर्षांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते एक टीम वर्क असतं आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा तो एक धडा असते. या सर्व कालखंडात मला शिकवणूक मिळाली आहे आणि मी माझी तुलना २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत केली तर आज मी स्वत:ला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो. कारण वेगवेगळ्या अनुभवांमधून वास्तव आपल्या लक्षात येतं आणि काही आघात सहन केल्यामुळे आपली शक्ती वाढते, आत्मिक ताकद वाढते. तसंच एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा, हेही आपल्याला कळतं. त्यामुळे माझ्यात मागील १० वर्षांत बदल झाला असून तो चांगल्या दिशेने झाला आहे," असं म्हणत फडणवीस यांनी मागील दशकभराच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयाचं कारण कोणतं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपनेही आजपर्यंतच्या राज्याच्या राजकारणाच्या इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवलं. या यशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या विजयात नक्कीच हिंदुत्त्वाचा मोठा वाटा आहे. लोकांनी महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर दिलं आहे. हिंदू समाजाने जातपात विसरून आम्हाला मतदान दिलं. पण त्यासोबत आमच्या सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्यातून आमच्याविषयी प्रो इन्कम्बन्सी तयार झाली आणि त्यामुळे हे यश मिळालं," असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी काळात नदीजोड प्रकल्प आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र