शहरं
Join us  
Trending Stories
1
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
2
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
3
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
4
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
5
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
6
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
7
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
8
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
9
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
10
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
11
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
12
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
13
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
14
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
15
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
16
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
17
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
18
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
19
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
20
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!

अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 5:41 PM

संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला.  

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात पक्षाच्या ५४ आणि अपक्षांच्या ६ जागा ते धरून पुढे कामाला लागा असं अजित पवारांनी बैठकीत सांगितले. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जावी. जागावाटपाची प्राथमिक बैठक झालेली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. 

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महायुतीची नागपूरात बैठक झाली, त्यात जागावाटपाचा सर्वसाधारण फॉर्म्युला काय असावा याची प्राथमिक चर्चा झाली. त्यावर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवानिमित्त काही काळ जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल. पक्षातील कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिले जातील यावर आज चर्चा झाली. मागील वेळी आपण ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यासोबतच जे अपक्ष आपल्यासोबत आहेत ते धरून ६० चा आकडा आहे. ते धरून तुम्ही पुढे वाटचाल करा असं अजितदादांनी म्हटलं. परंतु आम्ही ६० च जागा लढणार ही बातमी चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना विद्यमान जागांचे सूत्र होते. २०१९ च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना यश मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या विद्यमान जागा जास्त होत्या. लोकसभेत त्याप्रमाणे सूत्र होते. आता यावेळी सुद्धा तेच असेल. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असावा असाही निकष जागावाटपात असावा असं बैठकीत ठरवलं आहे असं सुनील तटकरेंनी सांगितले. 

दरम्यान,  राजकोट प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. मात्र पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित येतात. ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारतात हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उचित आहे हे वाटत नाही. संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला. 

नितेश राणेंचं ते विधान चुकीचे

मशिदीबाबत नितेश राणे यांनी केलेले विधान अतिशय अयोग्य आहे. त्याचा मी निषेध करतो. हा देश संविधानाच्या आधारे चालतो. सर्वधर्म समभाव ही देशाची मूळ संकल्पना आहे. मतमतांतरे असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात पण याप्रकारची विधाने करणे अयोग्य आहे असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं आहे. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४