शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरेगाव भीमा येथील घटना पूर्वनियोजित कटच होता : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:19 IST

कोरेगाव भीमा येथील घटना हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : कोरेगाव भीमा येथील घटना हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्याशी नक्षलवाद्यांचा कोणताही संबंध नाही. यामुळे परिसरातील गावांमधील भयभीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना संरक्षण देण्याबाबत जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची चर्चा झाल्याचेही आठवले यांनी सांगितले.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.याप्रसंगी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, हणमंत साठे, बाळासाहेब जानराव आदी उपस्थित होते.आठवले म्हणाले, अ‍ॅट्रोसिटी कायद्यावरून मराठा समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये अनुचित प्रकार घडला. त्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भिडे व एकबोटे यांची छायाचित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही; असा समज करून घेणे चुकीचे आहे.समिती स्थापन करावीछत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू येथील समाधीसाठी माझ्या खासदार निधीतून रक्कम देण्याची इच्छा आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. गोविंद महाराज यांच्याही समाधीस निधी दिला जाईल. संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये गोविंद महाराज होते किंवा नव्हते; याबाबत वढू ग्रामस्थांमध्ये संशय आहे. गोविंद महाराज हे संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करणाºया सेवेकºयांमध्ये होते, असा परंपरागत इतिहास चालत आलेला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यात आमचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही. त्यामुळे संविधान बचाव रॅली काढणाºयांनी स्वत:चा पक्ष वाचविण्याचा विचार करावा. राजकारण करताना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावRamdas Athawaleरामदास आठवले