शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Published: May 21, 2016 1:33 AM

गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली

शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवासासाठी एसटी बसअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे १० ते १२ गावांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे.बहुळ, शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, चौफुला, मोहितेवाडी, नवीनगाव, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, शेलगाव, कोयाळी-भानोबाची, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, काळूस, संगमवाडी, दत्तवाडी, रासे आदी गावांतील बहुसंख्य विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी चाकण तसेच राजगुरूनगरमध्ये जात आहेत. बहुतांश विद्यार्थी पासधारक असल्याने शाळेत ये -जा करण्यासाठी एसटी बसचाच वापर त्यांना करावा लागत आहे. राजगुरूनगर, चाकणमधील महाविद्यालये साडेअकराच्या दरम्यान सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी चाकणहून दुपारी बाराच्या दरम्यान एसटी बस उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. परिणामी सर्वच विद्यार्थ्यांना बसपास किंवा एसटीपास असूनसुद्धा इतर वाहतुकीचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. परिणामी वाहतुकीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे जास्त पैसे आकारले जात असल्याने त्यांना नाहक ‘आर्थिक’ भुर्दंड सहन करून मार्गस्थ व्हावे लागते. चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकण आगारातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी बस सुरु करून द्यावी, अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून केली जात आहे.।‘‘एसटी बसअभावी प्रवासास आम्हा विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, धोका पत्करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो. आमची गरज लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षात वेळेत बससेवा सुरु करून द्यावी.’’- महाविद्यालयीन विद्यार्थिनी>नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर सोय व्हावीशालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी मार्गस्थ होत असतात. परंतु मुलींना भीतीपोटी नाहक त्रास सहन करून एसटीचीच ताटकळत वाट पाहत उभे राहावे लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे. दरम्यान रोडरोमिओंचा त्रासदेखील विद्यार्थिनींच्या पदरी येतो.चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे.