शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील अपघातात वाढ

By admin | Published: January 17, 2017 3:27 AM

कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हे अपघात होत असून ही बाब बांधकाम विभागाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. मात्र तरीही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्य मार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ गतिरोधक आणि आणि पुढे लगेच खड्डा असल्याने याठिकाणी वारंवार अपघात होतात. दोन महिन्यांत दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला येथे अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कर्जत तालुक्यात अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी प्रवासी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. रस्ते भरण्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले असले तरी तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने आठवडाभरातच रस्ते ‘जैसे थे’ च होते. परंतु लाखो रु पये खर्च करून ठेकेदार खड्डे कशा प्रकारे भरतात याची पाहणी अधिकारीकरीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. कर्जत - कल्याण मार्गावरही अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पहायला मिळत आहेत. हे खड्डे आतापर्यंत चार वेळा भरण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यांची दुरवस्थाच आहे. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळून काही भाग रस्त्यावर आला होता. ही दरड अद्याप उचललेली नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर डिकसळ येथील अपघात ठिकाणाची पाहणी करून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील हॉटेलजवळ गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून अपघातासंदर्भात कळविले आहे. परंतु त्यांनी अद्यापही या जागेची पाहणी केली नाही. त्यांनी या अपघात ठिकाणी काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने येथे अपघाताची मालिका सुरूच आहे.- किशोर गायकवाड, स्थानिक ग्रामस्थ,डिकसळ