शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ

By admin | Published: March 18, 2016 4:05 AM

महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील

मुंबई : महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे अपहरण करणे वा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे. विधानसभेत आज सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सामाजिक क्षेत्रावर प्रकाश टाकताना ही माहिती देण्यात आली आहे. २०१३ मध्ये महिलांवरील बलात्काराच्या ३०६३ घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ही संख्या ३४३८ वर गेली. २०१५ अखेर हा आकडा ४१७६ वर गेला आहे. अपहरणाच्या घटना पहिल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८७४, २४५७ अशी होती. २०१५ मध्ये अपहरणाच्या ४८६४ घटना घडल्या. महिलांच्या विनयभंगाच्या ११६९६ घटना गेल्या वर्षी घडल्या. २०१३ मध्ये ही संख्या ८१३२ तर त्यानंतरच्या वर्षी १०००१ इतकी होती. लैंगिक अत्याचाराच्या घटना मात्र कमी झाल्या. त्यांची संख्या तीन वर्षांत अनुक्रमे २६३२, १५७५ आणि ९८६ अशी होती. (विशेष प्रतिनिधी)बालक अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ- बालकांचे अपहरण वा त्यांना पळवून नेण्याच्या घटना २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिपटीने वाढल्या. - २०१४ मध्ये २६१६ बालकांचे अपहरण झाले होते. २०१५ मध्ये ६५७६ बालकांचे अपहरण झाले. - बालकांच्या खुनाचे प्रमाण मात्र घटले. २०१४ मध्ये २०७ तर नंतरच्या वर्षी १४३ खून झाले.