शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

‘वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवाव्यात’

By admin | Published: May 19, 2016 5:09 AM

राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात.

मुंबई : राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात. पण त्या वेळी पदव्युत्तर (एमडी, एमएस) शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० इतकीच आहे. राज्य सरकारने मनावर घेतल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढू शकतात. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) पत्र लिहिले आहे.८ आॅगस्ट २०१५ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागेसाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिली असेल, तर ते महाविद्यालय केंद्र सरकारच्या परवानगीने जागा वाढवू शकते. त्या निकालानुसार राज्यातील शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणे सहज शक्य आहे. या जागा वाढल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याचे मत सेंट्रल मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी व्यक्त केले. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. पण, सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवल्यास सहज जागा वाढवणे शक्य आहे. कारण, जागा वाढवण्यासाठी ‘एमसीआय’च्या पुन्हा पाहणीची आवश्यकता नसते, असे मार्डने पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)