शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

टँकर खर्चातील वाढ संशयास्पद

By admin | Published: April 28, 2016 12:59 AM

फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांना पालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जाते.

पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांना पालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जाते. त्यासाठीचा गत दोन वर्षांपूर्वीपर्यंत फक्त ४५ लाख रुपये खर्च येत होता; मात्र मागील दोन वर्षांत हा खर्च एकदम अडीच कोटी रुपये झाला आहे. इतका खर्च करून दिले जात असलेले पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला.कचरा डेपो असल्यामुळे उरुळी देवाची, तसेच फुरसुंगी या गावांमधील पाणी दूषित होत असल्याची तक्रार संबंधित गावांमधील नागरिकांनी केली होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पालिकेने या गावांना टँकरने पाणी पुरवण्याची जबाबदारी तर घेतलीच शिवाय तिथे काही विकासकामेही करून देण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे पालिकेने तिथे आतापर्यंत तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात पाण्यासाठी साधारण ४५ लाख रुपये खर्च येत होता.मागील दोन वर्षांत फक्त पाण्याच्या टँकरसाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च शंकास्पद असल्याचे बालगुडे यांचे म्हणणे आहे. काही विशिष्ट लोकांकडून पालिका देत असलेले पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. विकासकामे करून देत आहे, मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असे ते म्हणाले. काँक्रीटीकरण करून घेणे, डांबरीकरण करणे याबरोबरच अनेक कामे पालिकेकडून करून घेतली जात आहेत व आता खर्च करून दिले जात असलेल्या पाण्याचाही गैरवापर होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अडीच कोटी रुपये खर्च करून दिलेले टँकर नक्की जातात कुठे? याचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.