शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

शेतकऱ्यांना वाढीव मदत

By admin | Published: March 17, 2015 1:06 AM

सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे.

सुनील कच्छवे ल्ल औरंगाबाद सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून याआधी मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच दुष्काळी मदत देण्यात आली आहे. आता दुसऱ्यांदा संकटात सापडलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना आणखी एका हेक्टरची मदत दिली जाईल. अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले आहेत.मराठवाड्यातील सुमारे ३ लाख मोठ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. दोन महिन्यांपासून या पॅकेजचे वाटप सुरू आहे. जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी साडेचार हजार, बागायती क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये आणि फळ पिकांखालील क्षेत्रासाठी बारा हजार रुपये याप्रमाणे ही मदत दिली जात आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व क्षेत्रासाठी, तर मोठ्या शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच ही मदत जाहीर झालेली आहे. मात्र; गतवर्षी गारपिटीचा फटका बसला होता़ फेबु्रवारी २०१४मध्ये १४ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. च्राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागला असेल तर मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंतची मदत देण्यात यावी, असा निकष आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष करून मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. ‘लोकमत’ने ९ मार्च रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर राज्य सरकारने निकषांनुसार वाढीव मदत देण्याचे ठरविले आहे. च्यंदा मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विभागातील जवळपास सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना मदत देऊ केली आहे. गतवर्षी १० लाख हेक्टरवरचे नुकसान झाले होते. तेव्हा विभागातील १४ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यात आली होती. आता दोन्ही वर्षी नुकसान झालेल्या १४ लाख शेतकऱ्यांपैकी मोठ्या शेतकऱ्यांना वेगळे काढून त्यांना वाढीव मदत दिली जाणार आहे.याद्या तयार करण्याचे आदेशविभागात सलग दुसऱ्या वर्षी नुकसान झालेल्या मोठ्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत दुष्काळी मदत मिळणे अपेक्षित आहे. उर्वरित एका हेक्टरच्या मदतीसाठी याद्या तयार केल्या जात असल्याचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गारपिटीमुळे द्राक्ष, डाळींब, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा बियाण्यांच्या झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सोमवारी शेतकऱ्यांनी चांदवड आणि दिंडोरी येथे रास्तारोको केला. चांदवड तालुका काँग्रेसतर्फे मुंबई - आग्रा महामार्गावर पेट्रोलपंप चौफुलीजवळ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तर दिंंडोरीत माजी आमदार धनराज महाले, नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर द्राक्ष ओतून व वीज बिलाची होळी केली.