शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

किडनी विकारांचा धोका वाढतोय !

By admin | Published: March 12, 2015 6:01 AM

बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच

पूजा दामले, मुंबई बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच किडनीचे आजार जडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. किडनीच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या १० पैकी एका व्यक्तीला किडनीचा त्रास आहे. पण २०२० पर्यंतही हे प्रमाण ७ पैकी १ असे होण्याचा धोका संभवत असल्याचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. ज्योत्स्ना झोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. किडनीचे कार्य म्हणजे रक्तातील अनावश्यक घटक गाळणे. पण या कार्यात ८५ ते ९०% बिघाड झाल्यानंतर अनेकांना त्रास जाणवू लागतो. त्या वेळी त्यांना डायलेसिस करण्याची आवश्यकता भासत असल्याचेही डॉ. झोपे यांनी सांगितले. भारतात दरवर्षी २ लाख नवीन रुग्णांना डायलेसिसची गरज भासते. पण त्या तुलनेत डायलेसिस मशिन उपलब्ध नाहीत. शहरांसारख्या ठिकाणी लोकांना डायलेसिसची सेवा उपलब्ध आहे. ग्रामीण भागात अनेकांना डायलेसिस घेण्यासाठी पाच - सहा तास प्रवास करून जावे लागते. तिथे गेल्यावरही त्यांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळेलच, याची शाश्वती नाही. मुंबईत २०० डायलेसिस सेंटरमध्ये ७०० मशिन्स आहेत. तर रुग्णांची संख्या ४ हजारांच्या घरात असल्याने डायलेसिससाठी बराच वेळ रुग्णांना थांबावे लागते. अनेकदा रुग्ण डायलेसिस घेऊन रात्री दीड-दोन नंतर घरी जातात, असे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बिछू यांनी सांगितले.