नाशिक/जळगाव/वर्धा : नाशिक जिल्ह्यासह खान्देश, नगर आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली़, तर काही ठिकाणी गारपीटही झाली़ त्यामुळे द्राक्ष, केळी, गहू, बाजरी व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ तर नगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला़ खान्देशात बुधवारी रात्री अवकाळी पावसासह गरपीट झाली़ धुळ्यात एक बैल आणि १५ शेळ्या ठार झाल्या. जळगाव, भुसावळ, आणि वर्धा तालुक्याला फटका बसला आहे. (प्रतिनिधी)
अवकाळीचा फटका!
By admin | Published: March 13, 2015 1:33 AM