शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Ind Vs PaK T20 World Cup: थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 10:44 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला लोळवत विजय मिळवला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीनंतर, विराट आणि पांड्या यांची शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अविस्मरणीय विजय -"पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा," असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

 

विराट कोहलीनं फक्त 10 चेंडूत ठोकल्या 48 धावा -या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलदाज विराट कोहलीने (Virat Kohli) धडाकेबाज अर्धशतक ठोकत इतिहास रचला. कोहलीने 53 चेंडूंचा सामना करत एकूण सहा चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत कोहलीने 48 धावा तर फक्त 10 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच केल्या. हे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील कोहलीचे 11वे अर्धशतक ठरले. 

याच बरोबर, टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट कोहलीने आता रोहित शर्मा मागे टाकले आहे. आजच्या सामन्यानंतर आता त्याच्या 3794 धावा झाल्या आहेत. तर रोहितच्या नावार 3741 टी-20 इंटरनॅशनल धावांची नोंद आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२