शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 2:10 AM

याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील

पनवेल (रायगड) : याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे केले. पंतप्रधानांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्युरिटी मार्केटचे (सेबी-एनआयएसएम) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, मोठ्या प्रमाणावर ती विस्तारत आहे. आर्थिक वृत्तपत्र वाचताना आता समाधानकारक चित्र दिसते. मी नव्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो तेव्हा स्टार्टअपचा उपक्रम यशस्वी होत असल्याचे समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.स्कील इंडियाच्या माध्यमातून देशातील उत्पादकता वाढविण्यासाठी युवकांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, तरुणांना कौशल्यशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आव्हान स्वीकारण्यास ते तयार असले पाहिजेत. तसेच जनहितार्थ तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी बाजारातून भांडवल उभे केले पाहिजे, असे मत मोदींनी व्यक्त केले.यशाचे मोजमाप करायचे असेल तर दलाल स्ट्रीटवर नव्हे, तर गावांमध्ये किती प्रभाव पडला हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मोदी म्हणाले, आर्थिक बाजारपेठेच्या शिक्षणामध्ये एनआयएसएम महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र भांडवली गुंतवणुकीपासून सामान्य जनता दूर आहे; त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर दूरदर्शी पायाभूत सुविधांवर भांडवली बाजारातील पैसा खर्च व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.मजबूत आणि निर्माणक्षम अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी जे जे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील ते ते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सुरक्षा यंत्रणांचे पदाधिकारी, सेबीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एनआयएसएमचे होणार विद्यापीठयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनआयएसएमचे विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.