शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

माहिती आयुक्त गायकवाड यांना औरंगाबादमध्ये बेदम मारहाण

By admin | Published: April 18, 2017 5:27 AM

मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून राज्याचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड

विकास राऊत , औरंगाबादमुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून राज्याचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नी शिवगंगा यांना भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील सुभेदारी विश्रामगृहावर घडली.गायकवाड हे शासकीय दौऱ्यावर सपत्निक औरंगाबादेत सोमवारी सकाळी आले होते. ‘सुभेदारी’वर त्यांचा मुक्काम होता. सामान ठेऊन ते कोकणवाडीतील माहिती कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. दुपारी तीनच्या सुमारास ते परतले असता, भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. महिला कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुभेदारीत दडून बसलेल्या इतर कार्यकत्यांनी चोहोबाजूंनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी सुरक्षाकवच देईपर्यंत भारिपचे कार्यकर्ते गायकवाड दाम्पत्यास मारहाण करत होते. पोलिसांनी गायकवाड दाम्पत्याची सुटका करून विमानतळावर सुखरूप पोहोचविले. गायकवाड यांनी मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, ती औरंगाबादेत वर्ग करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या घटनेत दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. गायकवाड यांच्यावर राग होताच : डोळसमुंबईतील आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीची, आंबेडकरी कुटुंबीयांची हेटाळणी केली, त्यामुळे आंबेडकरी समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड राग होता. तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता. तो आज औरंगाबादेत झाला, अशी प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केली. ते स्वत:च कारणीभूत ?रत्नाकर गायकवाड यांच्याबाबतीत आज जो प्रसंग उद्भवला, त्यास ते स्वत:च कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड बी. एच. गायकवाड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आंबेडकर भवन हे प्रेरणास्थान आहे. तेथे बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांची कार्यालये होती. ती तोडून टाकणे हे योग्य नव्हते. ही कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे काम गायकवाड यांनी केले नसते, तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अमित भुईगळ आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा (कलम ३०७) गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय दंगलीचा (कलम १४७, १४८, १४९) तसेच सरकारी कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई धुळे, रेखा उजगरे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे यांनी हल्ला केला. या सर्वांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.