शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

By admin | Published: June 04, 2017 1:37 PM

जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 -   जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण दाखवून दिले पाहिजे . आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये पोहचवणे हे आमचे ध्येय आहे , आयुर्वेद जगाच्या भल्यासाठी आहे. आयुर्वेदाची जोपासना आणि प्रचार करायचा असेल तर त्यासाठी आपली पायाभूत सुविधा आणि संशोधन बळकट केले पाहिजे असे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईत आयोजित ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ आणि ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार सोहळ्य दरम्यान म्हणाले. ११८ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल करणाऱ्या ‘साण्डू’ या जगविख्यात आयुर्वेद कंपनीने आपल्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व निःस्पृह सेवा देणाऱ्या मान्यवर वैद्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित केला होता.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाचा महिमा कायम ठेवत लाखो रुग्णांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्यास हातभार लावणाऱ्या वैद्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. वैद्य अनंत धर्माधिकारी (पुणे) आणि वैद्य मदन गुलाटी (चंदिगढ) यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ पुरस्कार तसेच वैद्य सुविनय दामले (कुडाळ- सिंधुदुर्ग), वैद्य चंद्रकांत त्रिपाठी (जळगाव) आणि वैद्य मनोज उपाध्याय (सुरत- गुजरात) यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक व साण्डू आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू’ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आयुर्वेद हे रामबाण उपचार पध्दती करावी असे आमचे प्रयत्न आहे. भारत आणि अमेरिका आयुर्वेदाचा प्रचार वाढवण्यासाठी लवकरच सामंजस्य करणार आहे असे हि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात आयुर्वेदाशी संबधित विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन केले गेले. पहिल्या सत्रात “२१व्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता व शक्ती” या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली
 यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर “बदलती संस्कृती..बदलता आहार” या विषयावर वैद्य श्री सुविनय दामले (सिंधुदुर्ग) यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “कॅन्सर व आयुर्वेद” यावर वैद्य समीर जमदग्नी (पुणे) यांनी आपले विचार या कार्यक्रमात मांडले.
आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटीशांच्या राजवटीच्या काळात मात्र या प्राचीन शास्त्रास तुच्छ समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. पण नेमक्या याच काळात काही अत्यंत समर्पित अशा लोकांनी या अतुलनीय अशा वारशाच्या जपणूकीचा जणू ध्यास घेतला होता. या कार्यात साण्डू हे नाव आघाडीवर होते. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊन १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये क्रांती आणण्याचे ठरविले. आयुर्वेदीक औषधांचा प्रसार आणि तळागाळातील लोकांनाही आयुर्वेदाचा लाभ या उदात्त आणि स्वच्छ हेतूंचा सतत पाठपुरावा हाच साण्डूच्या यशाचा पाया आहे. उच्च दर्जामुळे साण्डूची औषधे अत्यंत लोकप्रिय ठरली. १० मे १८९९ रोजी मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरु झालेली फॅक्टरी नंतर वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी चेंबूर येथे हलविण्यात आली असे साण्डू’ आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू यांनी सांगितले