शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

पाणीबचत करण्यासाठी सोसायट्यांचा पुढाकार

By admin | Published: May 20, 2016 2:44 AM

सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे.

अपर्णा जगताप,

मुंबई- राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. या परिस्थितीत काही अपार्टमेंट, सोसायट्यांनीदेखील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील हायवे दर्शन सोसायटीने अनोखी उपाययोजना केली. या सोसायटीचे सचिव प्रशांत वाढीवकर यांनी दोन्ही इमारतींतील सगळ्या घरांमधील गळतीची तपासणी करून ते दुरुस्त करून घेतले. दिवसभर पाणी वापरण्याऐवजी दुपारी २.३० ते सायं. ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे महानगरपालिकेकडून पाणी कमी आल्यास या साठ्याचा उपयोग सोसायटीला होऊ लागला आहे. आठवड्यातून एकदाच गाड्या धुण्याचे आवाहन सभासदांना करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीबचत होत आहे. बोअरिंगचे पाणी झाडांसाठी वापरण्यात येते. सोसायटीच्या आवारात वापरासाठी बसवण्यात आलेल्या ३ नळांपैकी २ नळांचे कनेक्शन गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही अतिरिक्त पाणी वापर कमी झाल्याचे वाढीवकर यांनी सांगितले. ‘गरजेपुरता पाण्याचा वापर’ असा संदेश या सोसायटीकडून दिला जात आहे. चुनाभट्टीतील गिरीश अपार्टमेंट आणि ठाण्यातील साकेत अपार्टमेंट यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या दिवसभर पाणी सोडण्याऐवजी फक्त अर्धा तासच पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे सर्व सभासद या उपक्रमाला साथ देत आहेत. कमी पाण्यात अधिकाधिक दैनंदिन कामे करण्याकडे या दोन्ही सोसायट्यांचा कल आहे.