शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब

By admin | Published: March 11, 2015 1:50 AM

राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने

मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास सरकारने नकार दिल्याने विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब झाले व अखेरीस दिवसभराकरिता स्थगित करण्यात आले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २८४ तालुक्यांत सरासरीच्या २० ते ८० टक्के कमी पाऊस झाला आहे. ९३ लाख हेक्टर जमिनीवरील पिके दुष्काळामुळे नष्ट झाली. हे संकट कमी म्हणून की काय २१ फेब्रुवारी, १ व ८ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळ, गारपीट व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर विरोधी पक्षाने दाखलेल्या स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करावी. सभागृह नेते एकनाथ खडसे म्हणाले की, सत्ताधारी विरोधकांच्या एक पाऊल पुढे असून, सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच याच विषयावर चर्चेचा प्रस्ताव दिला असल्याने स्थगन स्वीकारण्याची गरज नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास विरोध केला.यामुळे आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सदस्य वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते मुंडे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे ७ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थगन स्वीकारलाच पाहिजे. अवकाळी पाऊस व नुकसान यावर सत्ताधारी पक्षाचाही चर्चेचा प्रस्ताव असल्याने या विषयावर कधी चर्चा केली जाईल ते बुधवारी कळवण्यात येईल, असे उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केले. विरोधी सदस्य घोषणाबाजी करीत असताना त्या गोंधळात सत्ताधारी पक्षाने शासकीय कामकाज मंजूर करवून घेतले. (विशेष प्रतिनिधी)