शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लघुउद्योगांची ‘इन्स्पेक्टर राज’मधून मुक्ती

By admin | Published: December 01, 2015 1:20 AM

राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही.

मुंबई : राज्यातील १४ हजार लघुउद्योगांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देणाऱ्या कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उद्योगांना यापुढे परवान्याची गरज भासणार नाही. विजेचा वापर न करणाऱ्या आणि १०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांनाच आतापर्यंत परवाने घ्यावे लागत नसत. आता नवीन दुरुस्तीनुसार वीजवापर न करणाऱ्या आणि २०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांना परवान्याची गरज नसेल. तसेच, आतापर्यंत वीजवापर करणाऱ्या आणि २०पेक्षा कमी कामगार असलेल्या उद्योगांनाच परवाने घ्यावे लागत नसत. आता या उद्योगांमध्ये ४०पेक्षा कमी कामगार असले तर परवान्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांतील जवळपास १४ हजार ४०० उद्योगांची इन्स्पेक्टर राजमधून मुक्तता होणार आहे. असे असले तरी कामगार कायद्यातील कामगार हितविषयक बाबींची अंमलबजावणी करणे मात्र या दोन्ही प्रकारच्या उद्योगांसाठी अनिवार्य असेल. तसे केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कामगार विभागाला असेल. कारखाना अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाने मे २०१५मध्ये मंजुरी दिली होती. (विशेष प्रतिनिधी)महिलांच्या रात्रपाळीलासशर्त परवानगीमहिला कर्मचाऱ्यांना कारखान्यांमध्ये रात्रपाळीमध्ये बोलविता येईल; पण त्यासाठी विशिष्ट अटींचे पालन या दुरुस्तीनुसार कारखाना मालकांना करावे लागेल. महिला कर्मचारी आता सायंकाळी ७ ते पहाटे ६ या वेळेत कारखान्यांमध्ये काम करू शकतील. अर्थात, त्यासाठी त्यांची संमती लागेल. त्यांना रात्रपाळीत सुरक्षा, रात्री कामावर येताना आणि परतताना वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेसह सोय करावी लागेल. तसेच, कारखान्याच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीची सोय करावी लागेल. आतापर्यंत महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळीत बोलवायचे तर कामगार विभागाची परवानगी घ्यावी लागत असे.