शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ   
5
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
6
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
7
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
8
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
9
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
10
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
11
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
12
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
13
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
14
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
15
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
16
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
17
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
18
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
19
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
20
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत

टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना व्याजमाफी?

By admin | Published: May 08, 2016 2:24 AM

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून २००९-१०पासून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची

- विश्वास पाटील,  कोल्हापूर

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून २००९-१०पासून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागविली आहे. येत्या ११ मेपर्यंत ही माहिती जमा करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. माहिती संकलित झाल्यानंतर राज्य सरकारकडून टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीककर्जावरील व्याजमाफीची घोषणा होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. सहकार विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्यामुळे त्याला कर्जमाफीच द्यावी, अशी मागणी मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. त्यातच औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येणे शक्य आहे का, यासंबंधीची माहिती सादर करण्याचे आदेश गुरुवारीच (दि. ५) सरकारला दिले. त्या आदेशांची दखल घेऊन त्याच दिवशी सरकारने ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.सरसकट कर्जमाफी न देता गतवर्षीच्या कर्जावरील सर्व व्याज माफ करायचे असा विचार सरकार करीत आहे. ते माफ केल्यानंतर जी एकूण थकबाकी राहील तिचे पुनर्गठन करून त्या कर्जाचे हप्ते पाडून देण्यात येतील. त्यामुळे शेतकरी थकबाकीतून बाहेर पडेल. त्याचा परिणाम असा होईल की तो पुन्हा नवे कर्ज घेण्यास पात्र ठरू शकेल, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनास रिझर्व्ह बँकेची पूर्वमान्यता घ्यावयाची आहे. त्यासाठी २००९-१०पासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांकडील थकबाकीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी थकीत कर्जाची माहिती तातडीने संकलित करण्यात यावी.’’केंद्र शासनाने २००८ला कर्जमाफी दिली त्यानंतर राज्य शासनाने २००९ला कर्जमाफी दिली. त्यानंतर कोणत्या सालामध्ये किती शेतकऱ्यांची थकबाकी आहे, हे समजावे यासाठीच ही माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यामागे अन्य कोणताही हेतू अथवा कारण नाही.- चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त