शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

आंतरजातीय लग्न केल्यानं जोडप्याला जीवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 2:41 PM

आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीनं विवाह केला असला तरी अनेकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला आहे

प्रशांत भदाणे

जळगाव – सिनेमात दाखवण्यात येणारं चित्र हे नेहमी काल्पनिकच नसतं तर काही घटना खऱ्या आयुष्याशी निगडीत असतात. सैराट सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात घडत असेल तर ते दुर्दैवीच म्हणावे लागेल. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बाभळेनाग गावात ही घटना घडली आहे. एका तरुण-तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्यानं गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरु असून या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबीयांनाही अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही जिल्हा पोलीस प्रशासनानं या घटनेची दखल घेतलेली नाही त्यामुळे राज्यात कायद्याचं राज्य आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बाभळेनाग गावातील एका तरुण-तरुणीनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरजातीय विवाह केला. हे दोघे ४ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. विवाह केल्यानंतर दोघांना तरुणीच्या घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. गावातील इतर लोकही त्यांचा छळ करू लागले. तरुणाच्या कुटुंबानं हा विवाह मोडून गाव सोडून जावं म्हणून सर्वच स्तरातून दबाव टाकला जाऊ लागला. छळ असह्य झाल्यानं दोघांनी पारोळा पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी तरुणानं राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडं आपली कैफियत मांडली आहे.

आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीनं विवाह केला असला तरी अनेकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी आर्जव जोडपे करत आहेत. दरम्यान, या घटनेतील पीडित जोडप्यानं पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांची भेट घेत तक्रार केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केली आहे. पीडित जोडप्याला संरक्षण देण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेंनी दिली. मात्र आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून समाजातून होणारा विरोध महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना शोभणारा आहे का? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव