शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

चित्रा वाघ यांच्या संस्थेची चौकशी

By admin | Published: January 08, 2016 3:48 AM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मिळालेल्या शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याच्या कंत्राटाची

यदु जोशी,  मुंबईराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मिळालेल्या शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याच्या कंत्राटाची विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. बाजारात गोडेतेलाचे भाव १२५ रुपयांपेक्षा कमी असताना या संस्थेने १६० ते १९६ रुपये दराने तेल पुरविले. तांदूळ, केळी, मिरची, हळद, साखरेच्या दरांबाबतही हेच घडले. त्याच त्या संस्थांकडून याबाबतचे दर घेण्यात आले. विशिष्ट संस्थांनाच फायदा होईल, अशा पद्धतीने जीआर काढण्यात आले. प्रत्येक जीआर काढणारे कार्यासन अधिकारी सुहास चव्हाण हेच होते. दीक्षा सामाजिक संस्थेला त्यांचे काम समाधानकारक असेपर्यंत अन्नधान्यपुरवठ्याचे काम देत राहावे, असा अनाकलनीय उल्लेख जीआरमध्ये होता. त्यामुळे २०१० ते २०१५ या काळात संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील अनेक रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याचे कंत्राट मिळत राहिले. राज्य कर्मचारी आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घोटाळ्याची चौकशी केली आणि एकूणच प्रक्रियेत झालेल्या अनियमिततांवर बोट ठेवले होते. याच अहवालाचा आधार घेत या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली होती. ‘लोकमत’ने दिलेले वृत्त आणि चौकशी समितीच्या अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांना विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचे आदेश दिले. चित्रा वाघ यांच्या संस्थेला निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचे कंत्राट कसे देण्यात आले, त्यासाठी काढण्यात आलेल्या ‘जीआर’बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २२ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.त्याच दिवशी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या घोटाळ्याचा चौकशी अहवाल विधानसभेत सादर केला.विधिमंडळाचे अधिवेशन संपता संपता या प्रकरणी एसीबी चौकशीची शिफारस आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.विदर्भातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांशी संबंधित संस्थांना देण्यात आले होते.ते देताना कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसविण्यात आली आणि अन्नधान्याच्या दरांबाबतही गडबड होती, असे म्हटले जात असून या प्रकरणी चौकशी केल्यास अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.