शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

By admin | Published: March 03, 2016 4:32 AM

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे.

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सद्य:परिस्थितीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. हे गुन्हेगार गुंतवणुकीच्या फसव्या योजनांतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात व परदेशात पळून जातात. अशा गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तपासाच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे हे तपासणेही महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, तसेच कायदे व सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)1.20लाख कोटींची फसवणूककेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा म्हणाले की, विभागाने २०१५ मध्ये बँक घोटाळयाच्या १७१ केसेसचा तपास केला असून ही रक्कम २० हजार ६४६ कोटी रु पये आहे. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम १ लाख २० हजार कोटी इतकी आहे.