शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:44 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेकदां विरोधी पक्षाच्यावतीने आरोप करण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदाच सरकारने या योजनेत गैरव्यवहार झाले असल्याचे मान्य केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी सुद्धा केली असल्याची माहिती, तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

राज्यात सूर असलेल्या जलयुक्ताच्या कामांबद्दल जिथे जिथे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा १३०० जलयुक्त शिवाराच्या कामांची विभागीय चौकशी सुरु केली असल्याचा खुलासा सावंत यांनी केला. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही याचा सिद्ध निर्णय घेऊ, असे सावंत म्हणाले.

राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना मुंडे यांनी, गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली होती. यालाच उत्तर देताना सावंत यांनी वरील खुलासा केलं आहे.